समजा आपला मृत्यू झालेला आहे. आपण असं आता कुणी अस्तित्वातच नाही. आपण म्हणून आपण नुसतं आपलं नसणं अनुभवतोय. आहे ते बरं आहे, की नाही त्यामुळे काही गलबलून येतंय – कशाचा कशाला आपल्याला पत्ता नाही. आपण नुसतं शांतपणे सगळं पाहत आहोत (किंवा आपण पाहतोय हा नुसता आपला समज आहे).
किती लोकांचं काही बिघडेल? बॅंक पेन्शन देईल? दोन वर्ष होतायत आता सर्विसला. काय मिळेल माहित नाही. एकदोन इंशुरन्स आहेत छोटेमोठे. आपण ॲक्सिडेंटने मेलेलो असलो तर कदाचित ॲक्सिडेंटल इन्शुरन्सचे २० लाख मिळालेले असतील. ती करेल त्याला व्यवस्थित इन्वेस्ट. साधी एफडी ठेवली तरी १५ हजार वगैरे होतात महिन्याला. पण आपण असेच मेलेलो असलो तर? म्हणजे असंच काहीतरी खरडता-खरडता झोप लागली आणि दुस-या दिवशी उठलेलोच नसलो तर. काही सांगता येत नाही. आज काढलेला इंशुरन्स तर अजून सुरू पण नसेल झालेला. जीवनज्योतीचे दोन लाख असतील कदाचित..
त्याला काही अर्थ नाही. आपण मेलेलो आहोत. कदाचित आता चाललंय तेवढं सुरळीत नाही चालणार, पण चालेल सगळं.
मेल्यावरही आपण असंच डुकरासारखं ओठांचा चंबू करून बसलेले असू का? क्लीन, क्लियर, काम तर आपण नाहीच, जीवंतपणातही नव्हतो कधी (calm असे काम लिहावे, मेल्यानंतर तेही सांगता येणार नाही).
मेल्यावर आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे आपण हतबल असतो. मग तसं पाहिलं तर आत्ता आणि मरण यात काही फार फरक नाही. ही जीवंत हतबलता, ती अचेत हतबलता. मग तसंच पाहायचं म्हटलं तर जीवंत हतबलता म्हणजे अजुनच दुःखकारी. हतबलता आणि जीवंत काय?
मरण सचेत असायला असायला हवं होतं. पण मग सगळं कधीच संपणार नाही. हे असंच चाललेलं असेल. मी असेल, पण हतबल – ना फोन, ना लॅपटॉप, ना पुस्तक, ना गाणं.. किंवा गाणं असेलही कदाचित. सूर कानांवर पडत राहतील. तेवढ्याच जीवंतपणाच्या काही आठवणी. किंवा आठवण हा प्रकारही संपलेला असेल तोपर्यंत..
kya bat hai. bahut khub!